शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या निधीचा धनादेश वठणार कधी? आठवड्यानंतरही निधी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:37 IST

सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांसह शेतकरी रस्त्यावर उतरले तरीही, आवर्तनाचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. खा. संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे

सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांसह शेतकरी रस्त्यावर उतरले तरीही, आवर्तनाचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. खा. संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न करून ‘म्हैसाळ’सह जिल्ह्यातील तीन पाणी योजनांसाठी ५० कोटींचा निधी मिळविला. या घडामोडीस आठ दिवस झाले तरीही अद्याप पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ‘म्हैसाळ’च्या निधीचा ‘धनादेश’ वठणार कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टंचाई परिस्थिती अधिकच तीव्र होऊ लागल्याने म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. वाढत्या थकबाकीमुळे प्रशासनाने, शेतकºयांनी काही रक्कम भरावी, असे आवाहन केले होते. मात्र, यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामुळे योजनेपुढील अडचणीत वाढ झाली आहे. आवर्तनाच्या मागणीसाठी कॉँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले आहे.

शासनाच्या निधीतून थकबाकी भरून पाणी सुरू करण्याची मागणी होत असली तरी, त्यास सरकारचा प्रतिसाद मिळत नाही. तरीही खा. संजय पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, योजना चालू करण्याची विनंती केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनेची थकबाकी भरण्यासाठी ५० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. मात्र, यास आठ दिवस होऊनही अद्याप हा निधी पाटबंधारे विभागास मिळालेला नाही.

दुसरीकडे कॉँग्रेस व राष्टÑवादीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून, हे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचे भाजपचे पदाधिकारी म्हणत असल्याने राजकीय पक्षांत कलगीतुरा रंगला आहे.प्रशासकीय पातळीवर तीन-चार दिवसांचा कालावधी जात असल्याचा बचाव भाजप कार्यकर्ते करत असले तरी, अद्याप निधी मिळाला नसल्याने पाणी सुटणार तरी कधी? हा सवाल कायम आहे. याबाबत अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी योजना सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याचे सांगितले.शासनाची घोषणा : माहिती कोणाकडे?पन्नास कोटींच्या निधीची घोषणा होऊन आठ दिवस झाले तरीही अद्याप निधी मिळाला नसल्याबाबत व निधी मिळण्याची प्रक्रिया कुठंपर्यंत आली, याची माहिती घेण्यासाठी खा. संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.